जेव्हा रसायने, प्लास्टिक, विषारी घटक यांसारख्या घातक पदार्थांमुळे नद्या, तलाव, महासागर आणि भूगर्भातील पाणी यांसारखे पाण्याचे स्रोत दूषित होतात तेव्हा जल प्रदूषण होते. हे प्रदूषण पाण्याला जलचर, मानव आणि संपूर्ण पर्यावरणासाठी घातक बनवते.
प्रदूषित पाणी ही केवळ पर्यावरणीय समस्या नाही, तर ती थेट आपल्या आरोग्यास धोका निर्माण करते, अनेक आजारांना कारणीभूत ठरते आणि नैसर्गिक संतुलन बिघडवते. पण हे प्रदूषण नेमके येते कोठून? चला, जल प्रदूषणाच्या प्रमुख स्रोतांचा आढावा घेऊया.
आज, भारतात जल प्रदूषण ही एक गंभीर पर्यावरणीय समस्या बनली आहे. यामुळे केवळ नद्या, तलाव आणि महासागरांसारख्या जमिनीवरील पाण्यावर परिणाम झाला नाही तर भूगर्भातील जलसाठ्याच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे. भारतात पाणी प्रदूषित करणारे प्रमुख घटक पुढीलप्रमाणे आहेत:
१. औद्योगिक कचरा:
भारतातील अनेक मोठी शहरे नद्या आणि तलावांच्या काठावर वसलेली आहेत. दिसताना जरी ही गोष्ट चांगली वाटत असे तरी ह्यामुळे, या शहरांमधील औद्योगिक कचरा बहुतेकदा थेट या जलसाठ्यांमध्ये टाकला जातो, ज्यामुळे ते अत्यंत विषारी बनतात.
औद्योगिक कचऱ्यात समाविष्ट असलेले घातक घटक (प्रदूषक):
• जड धातू (शिसे, पारा, आर्सेनिक, कॅडमियम) – खाणकाम, चर्मकारखाना आणि बॅटरी कारखान्यांमधून उत्सर्जित होणारी विषारी रसायने.
• रासायनिक कचरा – कापड, कागद आणि औषधनिर्माण उद्योगांमधून बाहेर टाकली जाणारी विषारी रसायने.
• तेल आणि ग्रीस – तेलशुद्धीकरण केंद्रे आणि कारखान्यांमधून होणाऱ्या गळती.
• रुग्णालयातील कचरा – वैद्यकीय कचऱ्याची अयोग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे.
हे प्रदूषक जलचरांचा नाश करतात आणि आपल्या अन्न आणि पिण्याच्या पाण्यात प्रवेश करतात!
२. मलनिस्सारण आणि घरगुती कचरा:
लाखो लोक त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी नद्या, तलाव इत्यादी खात्रीच्या आणि मोठ्या जलस्रोतांवर अवलंबून असतात आणि जेथे मानवांसोबतच पाळीव प्राणी ही राहतात व तेथे त्यामुळे नियमितपणे सांडपाणी आणि घरगुती कचरा तयार होतो. दुर्दैवाने, हे अशुद्ध सांडपाणी आणि घरगुती कचरा बरेचदा कोणत्याही प्रक्रियेशिवाय थेट या जलस्रोतांमध्ये (नद्या, तलाव, इत्यादी) टाकला जातो.
घरगुती कचऱ्यामध्ये हे समाविष्ट आहे:
• प्रक्रिया न केलेले सांडपाणी – मानवी आणि प्राण्यांचे मलमूत्र, घरगुती कचरा.
• जंतू आणि जीवाणू – परजीवींसारखे आणि ई. कोलाय सारखे हानिकारक सूक्ष्मजीव जे जलाद्वारे उत्पन्न होणार्या रोगराईला कारणीभूत ठरतात. ।
जर सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया केली नाही तर, हे प्रमुख जलस्रोत संसर्गजन्य रोगांचे केंद्र बनतात जे मानव आणि प्राण्यांवर गंभीर परिणाम करू शकतात.
३. शेतीच्या कामामधुन निर्माण होणारा कचरा:
शेती ही जीवनासाठी आवश्यक आहे, परंतु शेतीमध्ये रसायनांचा अतिवापर हे जल प्रदूषणास अप्रत्यक्षरित्या कारणीभूत आहे. कसे ते पाहूया -
• खत आणि कीटकनाशकांचे वाहून जाणे:
पिकांवर फवारणी केलेल्या खतांमध्ये आणि कीटकनाशकांमध्ये असलेले नायट्रोजन, फॉस्फरस इत्यादी रसायने (उदा. डीडीटी, ऑरगॅनोफॉस्फेट्स) जलसाठ्यात प्रवेश करतात, ज्यामुळे विषारी शेवाळं वाढतात आणि जलचरांचा श्वास गुदमरतो. तसेच, ही रसायने भूजलालाही दूषित करू शकतात, व जल प्रदूषणास कारणीभूत ठरतात.
• प्राण्यांपासून निर्माण होणारा कचरा:
शेतीमध्ये गायी, म्हशी, मेंढ्या यांसारख्या पाळीव प्राण्यांमुळे मलमूत्र, जंतू (जीवाणू/विषाणू) आणि इतर जैविक कचरा तयार होतो. जर त्याची योग्य विल्हेवाट लावली गेली नाही, तर तो जवळच्या जलस्रोतांमध्ये मिसळून पाणी प्रदूषित करतो.
• गाळ वाहून जाणे:
जमिनीची मशागत आणि मातीची धूप यामुळे शेतीतून वाहून येणारा गाळ जलस्रोतांमध्ये साचतो, ज्यामुळे पाण्यात सूर्यप्रकाश कमी प्रमाणात पोहोचतो व पाण्यातील पर्यावरणाला हानी पोहोचते.
• क्षारयुक्त निचरा:
सिंचनातून येणारे अतिरिक्त क्षार भूगर्भातील जलात मिसळतात, ज्यामुळे हे पाणी वापरासाठी अयोग्य बनते.
४. प्लास्टिक कचरा (आपल्या महासागरांमध्ये आणि नद्यांमध्ये हळूहळू पसरणारे विष):
प्लास्टिक कचरा (पॅकेजिंग, बाटल्या, पॉलिथिन पिशव्या, कप, मायक्रोप्लास्टिक्स इ.) हा जलस्रोतांना होणार्या सर्वात मोठ्या धोक्यांपैकी एक आहे. तुम्ही कधी नदीत प्लास्टिकची बाटली तरंगताना पाहिली आहे का? आता कल्पना करा, अशा अब्जावधी बाटल्यांची! आता, हा प्लास्टिक कचरा कुठून येतो ते पाहूया -
याहूनही वाईट म्हणजे, मायक्रोप्लास्टिक्स आपल्या अन्नसाखळीत समुद्री अन्नाद्वारे (जसे की मासे) प्रवेश करतात, ज्यामुळे आरोग्यासाठी गंभीर धोके निर्माण होतात!
५. सांस्कृतिक कार्यक्रमांदरम्यान निर्माण होणारा कचरा:
नैवेद्य, वाहीलेली फुले, हार इत्यादी, सांस्कृतिक कार्यक्रमांदरम्यान निर्माण होणारा कचरा सामान्यतः पाण्यात विसर्जित केला जातो, ज्यामुळे प्रदूषण होऊ शकते. मात्र, हा कचरा योग्य पद्धतीने ठरवलेल्या ठिकाणी प्रक्रिया करून विसर्जित केल्यास ही समस्या सोडवता येऊ शकते.
६. उष्णता जन्य (थर्मल) कचरा:
वीज प्रकल्प आणि औद्योगिक कारखान्यांतून गरम पाणी थेट नद्या आणि तलावांमध्ये सोडले जाते, ज्यामुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते आणि जलचरांना जगणे कठीण होते. तापमानात अचानक झालेल्या बदलांमुळे अनेक माशांच्या प्रजाती मृत्युमुखी पडतात.
७. औषधे आणि वैद्यकीय कचरा:
तुम्ही कधी कालबाह्य झालेली औषधे फेकून दिली आहेत का? बरेच लोक असे करतात, परंतु त्यांना हे माहित नसते की औषधांचा हा कचरा पाणी दूषित करू शकतो.
८. आण्विक कचरा:
अणुऊर्जा प्रकल्पांमधून किरणोत्सर्गी कचरा निर्माण होतो, जो योग्य प्रक्रिया न करता नद्यांमध्ये टाकल्यास त्याचे मानव आणि प्राण्यांवर अनुवांशिक आणि आरोग्याशी संबंधीत दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.
अगदी लहानशी गळतीसुद्धा पाण्याला शतकानुशतके घातक बनवू शकते. हे अपरिहार्य नुकसान टाळण्यासाठी योग्य विल्हेवाट लावणे अत्यंत आवश्यक आहे!
भूगर्भजल प्रदूषण
पावसाळ्यात, पावसाचे पाणी जमिनीत खोलवर झिरपते आणि भेगा, कपारी आणि सच्छिद्र जागांमध्ये साठते (मूलतः भूगर्भातील पाण्याचा साठा). यालाच भूगर्भजल असे म्हणतात, जे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली साठवले जाते आणि ते आपल्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे.
कीटकनाशके, रासायनिक खते आणि मलनिस्सारण प्रणाली (सेप्टिक सिस्टम) मधून बाहेर पडणारा कचरा हळूहळू जमिनीत झिरपू शकतो आणि भूगर्भजल दूषित करू शकतो, ज्यामुळे ते पिण्यासाठी आणि इतर मानवी वापरासाठी निरुपयोगी बनते. एकदा प्रदूषित झाल्यानंतर, भूगर्भजल अनेक दशकांपर्यंत प्रदूषित राहू शकते, ज्यामुळे ते पुढच्या पिढ्यांसाठी देखील निरूपयोगी ठरू शकते.
पृष्ठभागावरील जल प्रदूषण
• गोड्या पाण्याचे प्रदूषण:
गोड्या पाण्याचे स्रोत (समुद्राव्यतिरिक्त इतर स्रोत) म्हणजेच नद्या, तलाव इत्यादी, हा मानवी वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा एक मोठा साठा आहे. भारतात गोड्या पाण्याचे प्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे. खालील कारणांमुळे ते सहजपणे दूषित होऊ शकते:
१. प्रक्रिया न केलेले सांडपाणी
२. शेतीच्या कामामधुन निर्माण होणारा कचरा
३. औद्योगिक कचरा
४. प्लास्टिक आणि इतर घनकचरा इ.
गोड्या पाण्याचे हे प्रदूषण जलचरांना नुकसान पोहोचवते, सिंचनावर परिणाम करते आणि मानवांमध्ये जलाद्वारे उत्पन्न होणारे रोग पसरवते.
• समुद्री जल प्रदूषण:
समुद्र पाण्याच्या (सागरी प्रदूषण) ८०% प्रदूषणाचे मूळ स्थलभागावर आहे. उद्योगांमधून निघणारा कचरा, रसायने, जड धातू आणि शहरे व शेतीतून वाहून जाणारा प्लास्टिक कचरा, नद्यांमार्गे समुद्रात मिसळतो. त्यातच तेल गळती आणि जहाजांमधून होणारी गळती यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट होते.
महासागरातील जल प्रदूषण सागरी पर्यावरण, मत्स्य उद्योग आणि मानवी आरोग्यास हानी पोहोचवू शकते. तसेच, याचा अर्थव्यवस्थेवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
जल प्रदूषण ही केवळ पर्यावरणीय समस्या नाही तर एक मानवी संकट आहे. याचा परिणाम होतो:
पुढील लेखात आपण पाणी प्रदूषणामुळे होणाऱ्या आरोग्य धोक्यांविषयी, स्वतःचे संरक्षण कसे करावे आणि या संकटाला रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात याविषयी सविस्तर माहिती घेऊ.
REFERENCES: